तुम्ही उरलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवता ? मग आरोग्यावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीमगृहिणी स्वयंपाक करताना अनेक उरलेले पदार्थ पुन्हा वापरण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवत असतात. उकडलेली भाजी, मळलेले पीठ असे अनेक पदार्थ उरल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवून ते पुन्हा वापरण्याकडे गृहिणींचा कल असतो. अनेकदा चपात्या करताना मळलेले पीठ उरते. हे उरलेले पीठ गृहिणी फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्या पिठाच्या चपात्या तयार करतात. तसेच जॉब करणाऱ्या महिला वेळेची बचत करण्यासाठी पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. आणि गरज असेल तेव्हा फ्रिजमधील पिठाचा वापर करतात. मात्र, या सवयीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यासाठी पीठ फ्रिजमध्ये ठेवणे टाळले पाहिजे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार फ्रिजमध्ये पीठ मळून ठेवण्याची ही सवय महागात पडू शकते. फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पिठ मळल्यानंतर लगेचच त्याचा वापर केला पहिजे. मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये रासायनिक बदल होतात. हे बदल आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजमधील हानिकारक किरणे त्यावर परिणाम करतात. त्यामुळे पिठामध्ये काही रासायनिक क्रिया घडतात. अशा पिठाची चपाती खाल्ल्यास आजारपण येऊ शकते. ओल्या पिठामध्ये फर्मेंटेशनची क्रिया लवकर सुरू होते. त्यामुळे या पिठामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हानिकारक केमिकल्स तयार होतात. हे सर्व बॅक्टेरिया आरोग्याला नुकसान पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. यापासून तयार केलेल्या चपात्या खाल्यामुळे पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे की, फ्रिजमध्ये मळलेले पीठ ठेवू नये. शिळ्या पिठाच्या चपात्यांची चव ताज्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपात्यांपेक्षा वेगळी असते. उरलेल्या पीठापासून बनविलेल्या चपात्या, पुऱ्या किंवा पराठे शिळे असतात. या शिळ्या चपात्या खाल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. गव्हाचे पीठ पचण्यासाठी जड असल्याने बद्धकोष्टाचा त्रास होतो. असा त्रास होत असल्यास चपात्या न खाण्याचा सल्ला दिला जातो. शिळ्या चपात्या खाल्याने सामान्यपणे बद्धकोष्टाचा त्रास होतो.