श्रीनगर : वृत्तसंस्था – भाजपाने जर कलम ३७० रद्द केले तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करू असे वक्तव्य जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी २०२० पर्यंत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि अनुच्छेद ३५ ए रद्द करण्याची घोषणा केली त्यावर त्यांनी हे वक्तव्य केले.
#WATCH Mehbooba Mufti: If you break that bridge (Art 370)…then you will have to renegotiate relationship b/w India-Jammu&Kashmir, there will be new conditions…A Muslim majority state, would it even want to stay with you?…If you scrap 370, your relation with J&K will be over pic.twitter.com/HlAMZh3KcC
— ANI (@ANI) March 30, 2019
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर, ज्या अटींवर जम्मू काश्मीर भारताचा एक भाग बनले जर त्याच अटी काढून घेणार असाल तर आम्हाला जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करावे लागेल. भाजपाने जर कलम ३७० रद्द केले तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करू. असा इशाराही जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला.
इतकेच नव्हे तर,काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये त्यांचे सरकार आल्यास काश्मीर घाटीतील सैन्यांची उपलब्धता कमी केली जाईल तसेच AFSPA वर पुर्नविचार केला जाईल असे आश्वासनही दिले. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सांगितलेल्या गोष्टीच काँग्रेसने जाहीरनाम्यात नमूद केले आहे. अशी मेहबूबा मुफ्ती यांनी म्हंटले.
याचबरोबर, जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान असावा अशी मागणी कालच ओमर अब्दुल्ला यांनी केली होती. तसेच जम्मू-काश्मीरच्या संरक्षणासाठी वेगळा पंतप्रधान त्या राज्याला मिळायलाच हवा. असेही त्यांनी म्हंटले होते.