शेतकरी राजेश निमकर हे पिकांना पाणी देण्यासाठी आणि चारा आणण्यासाठी सायकलवरून शेतात गेले होते. रात्री ८ वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता शेतात त्यांची सायकल आढळली. पण राजेश दिसले नाहीत. आणखी शोध घेतला असता राजेश यांचे धड आणि शिर वेगवेगळ्या ठिकाणी काही अंतरावर आढळले. घटनास्थळी पाहिल्यावर वाघानेच त्यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराने येथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. राजेश यांची कौटुंबीक परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. त्यातच त्यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.
देवीचे विसर्जन करताना तलावात बुडून मुलाचा मृत्यू
प्रशासनाने या नरभक्षक वाघाला पकडावे तसेच राजेश निमकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मंगरूळपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरोली येथे गुरुवारी दुपारीच काही लोकांना वाघाच्या पायाचे ठसे दिसले होते. त्याचे फोटो काढून त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले होते. यानंतर गिरोली येथे दोन दिवसांपासून वन विभागाचे कर्मचारी ठाण मांडून बसले होते. तरीही वाघाने हल्ला केला.