Mumbai : सागरी सेतूच्या कामासाठी जूहू किनाऱ्यावर बेकायदेशीर रस्त्याचे बांधकाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूच्या समुद्रातील कामाची साधनसामग्री नेण्यासाठी जूहू किनाऱ्यावर भरती-ओहोटी क्षेत्रात कच्च्या रस्त्याऐवजी पक्का रस्ता बांधला जात आहे. याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली आहे. दरम्यान, हा रास्ता तात्पुरत्या स्वरूपाचं असल्याचा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळनं सांगितलं आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस वांद्रे ते वर्सोवा दरम्यानच्या नऊ किमी लांबीच्या सी लिंकच्या कामास सुरुवात झाली होती. सी लिकंच्या वांद्रेकडील जमिनीवरील पाइलिंगचे काम हाती घेण्यात आले. सध्या वर्सोवा येथे जुहू कोळीवाड्याजवळून समुद्रातील कामासाठी साधनसामग्री नेण्यासाठी रस्त्याचे काम सुरू आहे. यावर पर्यावरण कार्यकर्ते झोरु भथेना यांनी या कामावर आक्षेप घेतला. पर्यावरण कार्यकर्ते झोरु भथेना यांनी लिंकच्या परवानगीमध्ये भराव घालणे, अथवा किनाऱ्यावर रस्ता बांधण्याचा समावेश नाही तसंच हे काम सागरी किनारा नियमन क्षेत्राचा भंग करणारे आहे. तक्रारीत म्हटलं आहे. भथेना यांनी तीन वर्षांंपूर्वी सी लिंकच्या कास्टिंग यार्डवरूनदेखील न्यायालयीन लढाई दिली होती. त्यावेळी महामंडळाने कास्टिंग यार्ड थेट जुहू बीचवर प्रस्तावित केलं होतं. अखेरीस तो पर्याय सोडून देण्यात आला होता.

याबाबतची लेखी तक्रार राज्याचे पर्यावरण मंत्रालय, महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे केली आहे. अशा कामांसाठी रस्त्याऐवजी रॅम्पचा वापर करण्याचे निर्देश असताना रस्ता का बांधला जात आहे, असा प्रश्न देखील या तक्रारीत विचारला आहे. तर यावर एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ‘या रस्त्याचे काम तात्पुरत्या स्वरुपाचे असून, रबर फिलिंग आणि स्टील जाळ्यांचा वापर दगडांना बांधून ठेवण्यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे किनाऱ्याचे नुकसान होणार नसून, काम संपल्यावर ही जागा पूर्ववत केली जाईल.’ दरम्यान, या तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग स्वीकारला जाईल असे झोरु भथेना यांनी सांगितलं.