नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी शुक्रवारी जर्मनीच्या चांसर्लर अंजेला मार्केल यांना फोन लावून काश्मीर मुद्यावर चर्चा केली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान इमरान खान म्हणाले की, भारताकडून रद्द करण्यात आलेल्या जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर यामुळे शांती आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मार्केल यांनी सांगतिले की, आम्ही या मुद्यावर लक्ष ठेवून आहे. परंतू भारताने आपली भूमिका जगासमोर स्पष्ट केली आहे.
भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्पष्ट केले आहे की, जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जा रद्द करणे हा अंतर्गत प्रश्न आहे. याशिवाय पाकिस्तानला सत्यता स्वीकारण्याचा सल्ला दिला. विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी मालदीवला काश्मीर मुद्याची माहिती दिली. तसेच मालदीवला शांति आणि स्थिरता तसेच वादाचे समाधान करण्यासाठी भूमिका घेण्याची विनंती केली.
शाहिद यांनी कुरैशी यांना सांगितले की, मालदीवला मान्य आहे. भारतीय संविधानच्या कलम 370 च्या संबंधात भारताचे हे अंतर्गत प्रकरण आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगतिले की शाहिद यांनी टेलीफोन कॉल केल्याबद्दल कुरैशी यांचे धन्यवाद मानले आणि सांगतिले की भारत आणि पाक मालदीवचे जवळचे मित्र आहेत. शाहिद यांनी मतभेद शांततापूर्ण आणि सहमतीने हे प्रकरण सोडवावे यावर जोर दिला.
- तुळशीचे पाणी अशाप्रकारे पिल्यास होतील अनेक फायदे, ‘हा’ उपाय करून बघा
- विवाहित महिला का घालतात जोडवे ? आरोग्याचे ‘हे’ होतात ३ फायदे
- ‘या’ नैसर्गिक पद्धतीने वाढू शकते तुमची लैंगिक क्षमता
- अंडकोषात वेदना होण्याची ‘ही’ कारणे असू शकतात
- काही सेकंदातच जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय
- तुम्ही तोंडासंबंधी ‘या’ चुका करता का ? होऊ शकतात या समस्या, वेळीच व्हा सावध !
- अनेक आजारांवर रामबाण उपाय ‘हरड’, नियमित सेवन केल्याने दूर राहतील आजार