कार्यकर्ते नसल्याने सभा रद्द : काँग्रेस ची नामुष्की 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन 
काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा रात्री उशिरा पंढरपूरमध्ये दाखल झाली, यात्रेला नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने काँग्रेसला कार्यकर्त्यां अभावी नियोजित सभा रद्द करावी लागली.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B07GVMTWWX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61f1eff3-b014-11e8-bd0c-f36adcd1f08d’]

याबात अधिक माहिती आशिकी,  सरकारच्या विरोधात मतदारामध्ये जनजागृती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक सप्टेंबरपासून कोल्हापूर येथून जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्याचाच पुढचा टप्पा पंढरपूर होते. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती  मात्र ही यात्रा रात्री उशिरा पंढरपूरमध्ये दाखल झाली. यात्रेला नियोजित वेळेपेक्षा साडेतीन तास उशीर झाल्याने काँग्रेसला कार्यकर्त्यां अभावी नियोजित सभा रद्द करावी लागली आहे.  त्यामुळे पंढरपूरच्या जनसंघर्ष यात्रेचा डाव उडाला असे म्हणायला हरकत नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामध्ये या यात्रेचे भ्रमण असून सात सप्टेंबरला पुण्यात समारोप असणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, त्याचबरोबर अनेक नेतेगण सहभागी झाले आहेत. मात्र जनसंघर्ष यात्रेत नियोजनाचा अभाव असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

सीआरपीएफच्या कारवाईत ५०० माओवादी समर्थक ताब्यात

दरम्यान, सांगलीत झालेल्या जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरजार टीका केली. भाजप विरोधातील काँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आर.एस.एस. ची फौज कामाला लागली आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.

इतकेच नव्हे तर  मोदी-शहा जोडी काँग्रेसला घाबरली आहे, देशात मोदी हुकुमशाही करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली तर भीमा कोरेगाव प्रकरणाचा छडा लावला जातोय पण दाभोलकर, पानसरेंचे खुनी पकडले जात नाहीयेत.कारण पुरोगामी विचार सरकारला संपवायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सार्वजनिक वाहतुकीसाठी एक देश, एक कार्ड

बॉम्बे टॉकीज जवळ असणाऱ्या गोदामात आग