काश्मीरी मुलींसोबत विवाह करण्यासाठी देशातील युवक ‘उताविळ’, Google वर चालु आहे ‘हे’ काम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडीयावर “मॅरी कश्मिरी गर्ल” आणि “हाऊ कॅन आय मॅरी अ कश्मिरी गर्ल” सर्च करण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरातून कश्मिरी मुलींशी लग्न करण्यासाठी गुगलवर फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
मॅरी कश्मिरी गर्ल सर्च करण्यात सर्वात पहिला क्रमांक पश्चिम बंगाल, दुसरा क्रमांक दिल्ली, तिसऱ्या क्रमांकावर तेलंगाना, चौथ्या क्रमांकावर कर्नाटक तर पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. त्यानंतर कश्मिरी गर्ल सर्च करण्यात केरळ पहिल्या, झारखंड दुसऱ्या तर हिमाचल प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. सहा ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये मॅरी कश्मिरी गर्ल सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर देशातील नागरिकांना आता कश्मिरमध्ये जमीन खरेदी करता येणार आहे.
त्यामुळे कश्मिरमध्ये जमीन खरेदीसाठी झारखंडमध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आले आहे. त्यानंतर दिल्ली त्याखालोखाल हरियाणा राज्यात कश्मिरमध्ये जमीन खरेदीवर सर्च करण्यात आले आहे.
मागील सात दिवसात पश्चिम बंगालमध्ये कश्मिरी मुलींची छायाचित्रे सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आली आहे. त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक वेळा कश्मिरी मुलींच्या छायाचित्रे पाहण्यासाठी सर्च करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
- ‘या’ भाज्यांमध्ये आहे ऑरेंजपेक्षा जास्त ‘व्हिटॅमिन सी’, अवश्य वाचा
- यामुळे वाढू शकतात ‘प्रेग्नेंसी’चे चान्सेस, ‘या’ ९ पध्दती आवर्जून करून पहा
- अशी तरुणी करते तुमच्यावर आयुष्यभर प्रेम ! जाणुन घ्या ‘हे’ खास संकेत
- सावधान ! अंधारात ‘स्मार्टफोन’ वापरताय, तर होऊ शकते ‘ही’ समस्या ; जाणून घ्या
- कोमट तेलाने मसाज करा, ‘हे’ आहेत ५ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या
- नात्याचा उलघडा करतात झोपण्याच्या ‘या’ पद्धती, पाहा तुम्ही कसे झोपता
- घरात शुध्द हवा खेळती राहावी यासाठी लावा ‘ही’ ४ रोपे, आजार होतील दूर
- प्रेग्नेंसीमध्ये वापरु नयेत ‘हे’ ४ ब्यूटी प्रॉडक्ट्स, तुमच्यासाठी ठरु शकते धोकादायक!
- ‘नैसर्गिक सौंदर्य’ हवे असेल तर प्रत्येक महिलेने लक्षात ठेवाव्यात ‘या’ ६ टिप्स ; जाणून घ्या