आश्चर्यजनक ! १५ दिवसांनी ‘मृत’ व्यक्ती घरी परतली

केरळ : वृत्तसंस्था – हाॅरर चित्रपटापेक्षाही भयानक प्रकार समोर आला आहे. एक मृत व्यक्ती अंत्यविधी पार पडल्यानंतरही चक्क 15 दिवसांनी घरी परतली. एखाद्या हॉरर चित्रपटाची कथा वाटतेय ना? पण ही कथा नसून, केरळातील कोझिकोडेमधील आडिकोल्ली गावात हा प्रकार घडला आहे. घरातून निघून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह एके दिवशी सापडला. घरातल्यांनी ओळखही पटवली आणि दफनविधीही पार पडला. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांनीच मृत व्यक्ती घरी परतली. साजी असे या व्यक्तीचे नाव आहे.
 
काय आहे नेमकी घटना ?
३ सप्टेंबरला साजी घरातून निघून गेला होता. त्यानंतर घरातल्या सदस्यांशी कधीही संपर्क झाला नाही. काही दिवसांनी कर्नाटकातील बैराकुप्पा जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो साजीचाच मृतदेह असल्याचा समज त्याच्या आई आणि लहान भावाचा झाला. शवविच्छेदन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आणि १६ ऑक्टोबर रोजी त्यांनी अंत्यविधीही केले. त्यानंतर पंधरा दिवसांनीच साजी घरी परतला. त्याला समोर पाहून घरच्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

जाहिरात
काय म्हणाला साजी
मी कन्नूरला परतत होतो. पनामारम बसथांब्यावर माझी आणि कर्नाटक परिवहनमध्ये बसचालक म्हणून नोकरी करत असलेला माझा चुलत भाऊ सुनीलची भेट झाली. तो माझ्याकडे काही वेळ बघतच बसला. घरच्यांनी माझे अंत्यविधी केले असल्याचं त्याच्याकडूनच कळलं. हे ऐकून मला धक्काच बसला, असं साजीनं सांगितलं.
अशी पटली होती मृताची आेळख
 

 ‘एका प्रकरणात तक्रार करण्यासाठी मी पूलपल्ली पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्यावेळी कर्नाटकातील जंगलात एक अनोळखी मृतदेह सापडल्याचं मला समजलं. चेहरा ओळखता येत नव्हता. साजीच्या पायावर शस्त्रक्रिया केलेली खूण होती. तशीच खूण या मृतदेहाच्या पायावर होती. तसंच मृतदेहाशेजारी चप्पल आणि कपडेही साजीसारखेच होते. काही लोकांनी त्या परिसरात साजीला पाहिल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळं मृतदेह साजीचाच असल्याचा समज झाला,’ असं त्याचा भाऊ जिनेशनं सांगितलं.

जाहिरात