नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आग्र्यामध्ये पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांना या जावयाला खाटेला बांधून चांगलाच चोप देत याचा व्हिडीओ बनवून तो नातेवाईकांना पाठवून दिला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात पाच व्यक्तींविरोधात शांतताभंग प्रकरणी कारवाई केली आहे. मात्र पीडित व्यक्तीने यासंबंधी कोणतीही तक्रार दाखल केली नसून दोन्ही कुटुंबांमध्ये सामंजस्य झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सुभाष याचा एका वर्षापूर्वी नगला गावातील युवतीशी विवाह झाला होता. त्याच्यावर पत्नीला मारहाण करत असल्याचा आरोप होता. त्यामुळे त्याच्या मारहाणीचा कंटाळून पत्नी माहेरी आली होती. त्यामुळे तो आपल्या पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी सासुरवाडीला गेला. मात्र त्याठिकाणी त्याचा तेथे वाद झाला. त्यावेळी तेथील लोकांनी त्याला बांधून बेदम मारहाण केली.
त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल देखील केला. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्या ठिकाणी दाखल होत त्याची सुटका केली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर शांतताभंग प्रकरणी कारवाई केली असून दोन्ही कुटुंबांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडवला आहे.
Visit : Policenama.com
- तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी
- ‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका
- धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती
- ‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी
- एकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके ! निर्माण होतात आरोग्य समस्या
- थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय