मंत्रिमंडळात काही फेरबदलही होऊ शकतात’: फडणवीस

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन-मंत्रिमंडळातील सहकारी चांगले काम करतायत. त्यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करुन दाखवता येऊ शकते असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. इतकेच नाही तर मंत्रिमंडळात काही फेरबदलही होऊ शकतात असे त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, “माझ्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांची कामगिरी उत्तम आहे. थोडफार कमी-जास्त असू शकतं. पण सर्वच मंत्र्यांनी कामगिरी उत्कृष्ट आहे.”

या कर्यक्रमात ते बोलत असताना त्यांना ज्यावेळी मंत्रिमंडळात फेरबदल होणार का ? आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का ? असे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, “मंत्रिमंडळातील सहकारी चांगले काम करतायत. त्यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करुन दाखवता येऊ शकते.” इतकेच नाही तर मंत्रिमंडळात काही फेरबदल होऊ शकतात असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विशेष म्हणजे आपल्या सरकारच्या चारवर्षांच्या कार्यकाळात चांगल काम झालयं असं त्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. महत्त्वाचे म्हणजे पाऊस कमी होऊनही शेतीतल उत्पादन वाढलं आहे असा दावा फडणवीस यांनी केला. ऑनलाइनद्वारे पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सुरु आहे असे ते म्हणाले. धनगर आरक्षणासाठी प्रयत्न करु तसेच कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण देऊ असे फडणवीस यांनी सांगितले.