वराळे येथे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे नागरिकांकडून रविवारी जोरदार स्वागत झाले. रविवारी सर्व प्रचार दौरे रद्द असूनही गावाने केलेल्या आग्रहास्तव भेगडे यांनी स्वतःची कामे बाजुला ठेऊन नागरिकांच्या विनंतीला मान देत त्यांना प्राधान्य दिल्याने नागरिकांनी भेगडे यांचे तोंडभरून कौतुक केले. स्वागतादरम्यान लहान मुलांसह तरुणांनी हातात झेंडे घेऊन ‘कहो दिलसे बाळाभाऊ फिरसे’ अशा घोषणा दिल्या.
राज्यमंत्र्यांनी राबविलेल्या महायज्ञ आरोग्य शिबिराचा मावळ तालुक्यातील ६० ते ७० हजार नागरिकांना फायदा झाल्यामुळे आज नागरिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम झालेला आहे असे मत मावळ तालुका भाजपा प्रभारीचे भास्करआप्पा म्हाळसकर यांनी व्यक्त केले.
गावामध्ये रस्त्यांची कामे, विजेची कामे सरकारने राबविलेल्या घरकुल योजना, विमा योजना आणि बांधकाम मजूर योजना यांचा गावातील खूप लोकांना फायदा झाला आहे. तसेच स्त्रियांसाठी शेळीपालन, पीठगिरण, शिलाई मशीन अशा प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वबळावर उभे राहण्यास मदत केली. गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गोठ्याची सोय होण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असे मत सरपंच मनीषा निलेश शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन बाळा भेगडे यांचा सन्मान केला व गावासाठी दिलेल्या सुखसोयींबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी गावातील तरुण तरुणींना राज्यमंत्री समवेत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. विकासाचा दृष्टिकोन आणि राजकीय प्रलगभता असलेले सर्वसमावेशक नेतृत्व बाळा भेगडे असल्याने आमचे मत त्यांना असा निर्धार यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांनी केला.
Visit : Policenama.com
- बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी