कराड : पोलीसनामा ऑनलाईन
विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याने या घटनेनंतर हिंसक पडसाद कराडमधील येणपे गावात उमटले. हिंसक झालेल्या जमावाने संशयीतांच्या घरावर हल्ला करून दोन जणांना बेदम मारहाण केली. तसेच वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली. हा राडा सुरू असताना गावात तणावाचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी तालुका पोलिसांनी दोन्ही बाजूच्या ५० जणांवर खूनी हल्ला, विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7811a239-accb-11e8-a47d-c1d7d7f42232′]
राहूल संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महिलेचा खून करणारा तुमच्यातला आहे, असे म्हणत ३० ते ४० जण आमच्या घरावर चाल करून आले आणि त्यांनी आमच्या घरावर हल्ला करून दार मोडले. बाजूलाच असणाऱ्या वाहनांची मोडतोड केली. घरात घुसून मारहाण केली. या फिर्यादीवरून ३० ते ४० जणांवर बेकायदा जमाव जमवून खुनी हल्ला, विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. शिंदे करत आहेत.
शासनाच्या प्रयत्नांना यश : दत्ता पडसलगीकर स्वीकारणार मुदतवाढ