‘या’ 3 कंपन्या भारतामध्ये बनवतायेत ‘कोरोना’विरूध्दची वॅक्सीन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करताना कोरोना साथीच्या आजारात लोकांना मोठा दिलासा दिला. पीएम मोदी म्हणाले, देशात तीन कोरोना लसींवर काम सुरू आहे. शास्त्रज्ञांकडून ग्रीन सिग्नल मिळताच त्यांचे उत्पादन सुरू होईल. आता लोक जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत की, भारतात कोणत्या कंपन्या लसीवर काम करत आहेत. याचे उत्तर खुद्द वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) चे डीजी शेखर मांडे यांनी दिले आहे. त्यांनी सांगितले, सीरम इन्स्टिट्यूट, जाइडस कॅडिला आणि भारत बायोटेक कोरोना लसीवर काम करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारतीय वैज्ञानिकही मागे नाहीत. ते म्हणाले, पुढील काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत.

दरम्यान, जायडस कॅडिला कोविड – 19 ची लस क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. लसची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, क्लिनिकल ट्रायल्सच्या पहिल्या टप्प्यात लस पूरक आहार दिल्यास स्वयंसेवक निरोगी झाल्याचे आढळले. क्लिनिकल चाचण्यांची दुसरी फेरी देशाच्या विविध भागांमधील 1000 लोकांवर घेण्यात येईल. त्याच वेळी, भारत बायोटेकच्या नेतृत्वात देशातील 12 केंद्रांवर कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. आतापर्यंत पहिली चाचणी देशाच्या विविध भागात पूर्ण झाली आहे. दुसरा टप्पा सप्टेंबरच्या सुरूवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले पीएम मोदी

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, आज, कोरोनावर एक नव्हे, दोन नव्हे तर तीन-तीन लसीची चाचणी भारतात सुरु आहे. आम्हाला वैज्ञानिकांकडून ग्रीन सिग्नल मिळताच त्याचे उत्पादन सुरू होईल. कमीतकमी वेळात देशातील लोकांपर्यंत ही लस कशी पोहोचवायची याची ब्लू प्रिंट तयार आहे.