LAC वरील ‘तणाव’ कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात 15 तास चालली 9 व्या फेरीतील चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) ताणतणावाच्या दरम्यान मोल्डो येथे भारत आणि चीनची 9 व्या फेरीतील चर्चा रात्री उशिरा अडीच वाजेपर्यंत चालली. 15 तास चाललेल्या या बैठकीत तणाव कमी करण्यासाठी चर्चा झाली. 78 दिवसानंतर चीनबरोबर चर्चेची एक नवीन फेरी सुरू झाली आणि या संभाषणाच्या अगोदरच एअरचीफ मार्शल यांनी चीनला सांगितले होते की, भारतालाही आक्रमक होता येते.

विशेष म्हणजे पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून तणाव आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही बाजूंकडून सैन्य आणि शस्त्रास्त्रांची तैनाती करण्यात आली आहे. सीमेवर भारताने आर्टिलरी गन, टॅंक आणि सशस्त्र वाहने तैनात केली आहेत. दोन्ही देशांदरम्यान 8 फेऱ्यांची चर्चा झालेली आहे, परंतु लडाखमध्ये डेडलॉकचे निराकरण झाले नाही.

नो मॅन्स लँड बनवण्याबद्दल चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 व्या फेरीतील बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला होता की पांगोंग लेकच्या उत्तर भागातील फिंगर एरियाला सध्या नो मॅन्स लँड बनविले जावे. यावेळी लडाखच्या खोऱ्यातील तापमान शून्य ते 30 डिग्रीपर्यंत खाली गेले आहे. परंतु दोन्ही बाजूंकडून सैन्यात कोणतीही कमी करण्यात आलेली नाही. हिवाळ्यामुळे सीमेवर शांतता आहे, पण तणाव अजूनही कायम आहे.

चीनने करार मोडला, एलएसीवर सैन्याची जमवाजमव
दरम्यान, चिनी सैन्याने एलएसी जवळच्या तणावग्रस्त भागात लपून सैन्याची जमवाजमव केली आहे, तर चार महिन्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये समझोता झाला होता. यामध्ये ठरले होते की दोन्ही देश तणावग्रस्त भागात सैन्य जमवाजमव करणार नाहीत. काही क्षेत्रात चीनची वाढती पावले लक्षात घेता भारताने यापूर्वीच खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

एअरचीफ मार्शल म्हणाले होते- भारत देखील आक्रमक होऊ शकतो
भारतीय हवाई दलाचे प्रमुख (IAF) आरकेएस भदौरिया यांनी शनिवारी चीनचे नाव न घेता म्हटले होते की जर ते आक्रमक होऊ शकतात तर आपणही आक्रमक होऊ शकतो. त्यांनी हे विधान चीनच्या एलएसीवर आक्रमक होण्याच्या शक्यतेवर केले होते.