India China Face Off : ‘शक्तिमान’ मित्राचा भारताला पाठिंबा, ‘ड्रॅगन’ला महागात पडणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लखाडमध्ये LAC वर भारत-चीनमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांमधल्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आलं आहे. तर चिनच्या 43 सैनिकांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सक्षम असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही सावध प्रतिक्रिया येऊ लागल्या. संयुक्त राष्ट्र संघानं दोन्ही देशांनी आक्रमक न होता चर्चेतून तोडगा काढावा असा सल्ला दिला आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेनं चीनसंदर्भात सावध पवित्रा घेतला असताना रशियानं पुन्हा एकदा मैत्रीला जागत भारताला खुलेआम समर्थन दिलं आहे. सध्या लडाखच्या सीमेवर सुरु असलेला संघर्ष आणि चीनबरोबरची समस्या सोडवण्यासाठी रशियानं भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे, असं वृत्त एका वृत्तवाहीनीच्या उच्चपदस्थ सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. त्यामुळे चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

रशियाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन म्हणाले, आम्हाला आशा आहे की दोघांमधील तणाव लवकरच निवळेल आणि सहकार्याच्या संभाव्यतेचा विचार करून दोन्ही पक्ष सकारात्मक संवाद कायम ठेवतील. रशियाचा विश्वास आहे की, ते या क्षेत्रातील वाद सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. यापूर्वी बुधवारी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह म्हणाले होते की, भारत आणि चीनच्या लष्करी प्रतिनिधींनी संपर्क साधल्याने आधीच जाहीर केले गेले आहे, सध्या दोन्ही देशांकडून परिस्थितीवर चर्चा सुरु आहे. ते वाद आणि संघर्ष कमी करण्याच्या उपायांवर चर्चा करीत आहेत, आम्ही त्याचे स्वागत करतो.
भारत आणि रशिया यांच्यात घनिष्ट संबंध आहेत. दोन्ही देश आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार एकमेकांना सहकार्य करत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या दोघांनी यंदा कोरोनाच्या संकटासह अनेकदा चर्चा केली आहे. पुढील आठवड्यात तीन देशांचे परराष्ट्र मंत्री रशिया, भारत आणि चिन यांची बैठक होणार आहे. रशियन राजदूताने या बैठकीला एक निर्विवाद वास्तव म्हटले आहे.