भारताला मिळाला देशातील सर्वात मोठा जिल्हा, एक भाग पाकिस्तान तर दुसरा चीनच्या ताब्यात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम 370 हटल्यानंतर आता जम्मू-कश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. त्याचबरोबर भारताला सर्वात मोठा जिल्हा देखील मिळाला आहे.
लेह असे या जिल्ह्याचे नाव असून नवीन आकारानुसार लडाख क्षेत्रफळाच्या दृष्टीने जम्मू काश्मीरपेक्षा मोठे असून त्याच्याकडे मात्र दोनच जिल्हे आहेत. लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत. त्यामुळे लेह आता भारतातील सर्वात मोठा जिल्हा बनला आहे. त्याचबरोबर लेहचा एक मोठा हिस्सा हा पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यात देखील आहे.
याआधी गुजरातमधील कच्छ हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा होता. स्वातंत्र्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये 14 जिल्हे होते. यामध्ये कठुआ, जम्मू, ऊधमपुर, रियासी, अनंतनाग, बारामूला, पुंछ, मीरपुर, मुजफ़्फराबाद, लेह आणि लडाख गिलगिट , गिलगिट वजारत, चिल्हास आणि ट्रायबल टेरिटॉरी या चौदा जिल्ह्यांचा समावेश होता. त्यानंतर आता यांचे 28 जिल्हे झाले असून या नवीन निर्णयानंतर आता भारतात २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरच्या अखंडतेविषयी बोलायचे झाल्यास पाकिस्तानच्या ताब्यातील काही भाग आणि चीनच्या ताब्यातील काही भागाचा देखील भारताच्या अखंड काश्मीरमध्ये समावेश होतो.
1948 पासून काही भागावर पाकिस्तानने कब्जा केला आहे तर 1950 पासून काही भागावर चीनने कब्जा केला आहे. त्यामुळे चीन आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सीमावाद सुरु आहे.
दरम्यान, आता जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश झाले असून त्याचबरोबर लडाख देखील केंद्रशासित प्रदेश असणार आहे.
Visit : Policenama.com
- भात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क ! बिनधास्त करा सेवन
- क्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली ? जाणून घेवूयात रहस्य
- वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या
- ‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय
- भातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
- मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट
- सावधान ! जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे
- गर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता
- ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ हवेत का ? मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा
- पौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस !