कडाक्याच्या थंडीनंतर आता सतवणार ‘भीषण’ गर्मी, मार्चपासून वाढणार ‘तापमान’, IMD नं सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : या वर्षाच्या सुरूवातीला पहिल्यांदा गोठवणाऱ्या थंडीने हैराण केले होते, त्यात आता मार्च, एप्रिल आणि मेमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, यावर्षी उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. यावर्षी मार्च ते मे या कालावधीत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील सरासरी कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा पेक्षा एक डिग्री सेल्सिअस जास्त राहणार आहे. त्याच वेळी, जम्मू-काश्मीर, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे सरासरी कमाल तापमान उन्हाळ्यात 0.5-1 डिग्री सेल्सियस पर्यंत असू शकते.
तसेच जगभरातील तापमानात यावर्षी वाढ होऊ शकते. यावर्षी उष्णता अधिक असून पुढील पाच वर्षे हि रेकॉर्ड तोड उष्णता असणार आहे, अशी शक्यता ब्रिटनच्या हवामान खात्याने व्यक्त केली आहे. असे म्हटले जाते की 2020 ते 2024 दरम्यान दर वर्षी तापमान 1.06 डिग्री ते 1.62 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढू शकते. 2015 ते 2019 दरम्यान तापमानात 1.09 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या दरम्यान 2016 हे आतापर्यंतचे सर्वात जास्त उष्णता असलेले वर्ष ठरले आहे.
Press Release on Seasonal Outlook for the Temperatures during March to May, 2020 :
The March-April-May (MAM) season average temperatures are likely to warmer than normal over most of the meteorological subdivisions of northwest, west and central India and 1/3@rajeevan61 pic.twitter.com/F724JXcHKc
— India Meteorological Department (@Indiametdept) February 27, 2020
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभाग दरवर्षी उन्हाळा आणि हिवाळ्यासंबंधी अंदाज जारी करतो. आता दुसरा अंदाज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल. यानंतर पावसाळ्याचा अंदाज मेच्या सुरूवातीला जाहीर केला जाईल. हा अंदाज, मंत्रालयाच्या मान्सून मिशन प्रकल्पातील मान्सून मिशन कपल्ड फोरकॉस्टिंग सिस्टम (एमएमसीएफएस) वर आधारित आहे. ताज्या अहवालानुसार मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान, वायव्य, पश्चिम आणि मध्य भारतासह काही भागांत तापमान किंचित जास्त असेल. तसेच राजधानी दिल्लीत लवकरच उष्णतेत वाढ होणार आहे. यावर्षी मे-जूनमध्ये तापमान 45 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.