भारत-पाकिस्तान मधील तणाव कमी होणार, आता ‘हा’ही पर्याय उपलब्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. कारण कर्तारपूर कॉरिडॉरबद्दल दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळात चर्चा ठरलेली होती. ती आता वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. एका वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे.

‘कर्तार कॉरिडॉर’ हा एका समाजाच्या भावनेचा प्रश्न असल्याने आम्ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे चर्चेसाठी स्वागत करतो. १४ मार्चला याबाबतच्या चर्चेची पुढची फेरी होणार आहे. कर्तारपूर इथे जाण्यासाठी भारताने यापूर्वीच मार्ग सुचवला आहे. मात्र पाकिस्ताने दुसरा मार्ग सुचवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, काही वेळात पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन हे भारतात परत येणार आहेत. आटारी-वाघा बॉर्डरवर त्यांचे भारतात आगमन होईल. बुधवारी पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ‘मिग २१’ हे विमानाला अपघात झाला होता. तेव्हा अभिनंदन हे पाकिस्तानच्या जमिनीवर कोसळले. त्यानंतर पाकिस्तान सेनेनं त्याला ताब्यात घेतलं होतं. पंतप्रधान इम्रान खान यांनी, ‘शांततेचं पाऊल’ म्हणून भारतीय वैमानिकाला भारताला सोपवणार आहेत.