भारतात ‘या’ ठिकाणी बनतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, 2022 पर्यंत होईल काम पूर्ण

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये उभारण्यात येत असलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुल पुढील वर्षी तयार होणार आहे. रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेल्या हा पुल आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 35 मीटर उंच असेल. प्रोजेक्ट मॅनेजर डेप्युटी चीफ इंजिनियर आर. आर. मलिक यांनी सांगितले की, बांधकाम पूर्ण होण्याची डेडलाईन ऑगस्ट 2022 आहे.

मलिक यांनी म्हटले, अशाप्रकारचा पुल बनविणे सोपे नाही. हा काश्मीर खोर्‍याला कटरा आणि देशाच्या इतर भागाला जोडणार आहे. हा तयार झाल्यानंतर जम्मू येथील कटराहून श्रीनगरचा प्रवास 5-6 तासांनी कमी होईल.

वैष्णो देवी मंदिरसाठी प्रसिद्ध जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्याला आशा आहे की, पुल बांधल्यानंतर पर्यटनाला चालना मिळेल.

रियासीचे डेप्युटी कमिश्नर इंदु कंवल चिब यांनी म्हटले की, हा एकमेव पुल आहे ज्यावर हॅलीपॅडसुद्धा असेल. यामुळे दिल्लीहून लोकांना हॅलिकॉप्टरने येथे येणे शक्य होणार आहे. पुल स्थानिक लोकांसाठी रोजगाराचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे. तसेच अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होईल. स्थानिक लोक याची अतुरतेने वाट पहात असल्याचा दावा चिब यांनी केला.

या पुलाची लांबी 1.3 किमी आणि असून त्याची रिश्टर स्केलवर 7 किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपातही सक्षम राहण्याची क्षमता आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून हा प्रोजेक्ट विकसित केला जात आहे. हा उधमपुर-श्रीनगर-बारामूला रेल्वे लिंक योजनेचा भाग आहे.

सुरक्षेच्या काही चिंतांसह अनेक मुद्द्यांमुळे या महत्वाकांक्षी योजनेला अगोदरच खुप उशीर झाला आहे. मात्र, आता अपेक्षा व्यक्ती केली जात आहे की, प्रोजेक्ट 2022 मध्ये पूर्ण होईल. हा एक आगळा वेगळा पुल आहे. स्फोट आणि भूकंपविरोधी गुणांसह यामध्ये एक युनिक सिग्नल प्रणाली सुद्धा असेल, जेणेकरून इतक्या उंचीवर वेगवान वार्‍यांचा ट्रेनवर कोणताही प्रभाव पडणार नाही.