‘या’ 5 खेळाडूनी बांगलादेशच्या जवळ गेलेल्या विजयाला स्वतःकडे ‘हिसकावून’ घेतलं, मालिका 2-1 नं जिंकली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 30 धावांनी पराभव केला. भारताने 20 षटकांत 174 धावा केल्या होत्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशला 144 धावाच करता आल्या. या सामन्यात विजयासह भारताने हि मालिका 2-1 अशी जिंकली.
या सामन्यात अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली, मात्र आपण पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत.
1) दीपक चाहर
मध्यमगती गोलंदाज दीपक चाहर याने बांगलादेशी संघाचे कंबरडे मोडताना हॅट्रिकसह सहा विकेट घेतल्या. त्याने केवळ 3.2 षटकांत सात धावा देत बांग्लादेशच्या सहा विकेट काढल्या. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
2) श्रेयस अय्यर
रोहित आणि धवन लवकर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर याने भारतीय संघाची बाजू सावरून धरत शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 33 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने 62 धावा केल्या.
3) केएल राहुल
केएल राहुल याने देखील कालच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या. अय्यर आणि राहुलने तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली.
4) शिवम दूबे
शिवम दुबे याने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 30 धावा देत 3 विकेट मिळवल्या. त्याने बांगलादेशचा विकेटकिपर मुश्फिकुर रहीम याला बाद करत आपला पहिला बळी मिळवला.
5) मनीष पांडे
या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या मनीष पांडे याने देखील ताबडतोब 13 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या.
Visit : Policenama.com
- थंडीत रहा ‘अॅलर्जी’पासून दूर, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- छोट्या-छोट्या दुखण्यांवर ‘पेनकिलर’ घेतल्यास पुरूषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’
- हिवाळा असो की पावसाळा, ‘या’ 6 टिप्स फॉलो केल्यास नेहमी रहाल फिट
- झोपण्यापूर्वी ‘हे’ कधीही खाऊ नका, जाणून घ्या 2 कारणे
- गरोदर महिलांनी ‘या’ तेलाचा वापर अवश्य करावा, जाणून घ्या याचे फायद
- महिलांमध्ये ‘या’ ५ गोष्टींमुळे वाढते फर्टिलिटी, आजपासूनच करा आहारात समावेश
- ‘या’ ३ उपायांनी गोड खाण्याची सवय ८ दिवसांत होईल कमी, जाणून घ्या