टीम इंडियाकडून भारतीयांसाठी ‘प्रजासत्ताक’ दिनाचे गिफ्ट, केएल राहूलचं सलग दुसरं अर्धशतक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडला तो निर्णय योग्य नसल्याचं टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दाखवून दिलं. बॉलिंगमध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर बॅटिंगमध्य टीम इंडियाच्या फलंदाजांनी कमाल केली. केएल राहूलनं नाबाद अर्धशतक (57) झळकवलं. टीम इंडियानं 7 विकेटनी दुसरा टी-20 मॅच जिंकला.

133 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा (8) आणि कॅप्टन विराट कोहली (11) धावांवर बाद झाले. श्रेयस अय्यरनं (44) धावा केल्या. रविंद्र जडेजा, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह आणि शुर्दल ठाकूरनं उत्तम बॉलिंग केली. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 132 धावा केल्या होत्या. शिवम दुबेनं (8) रन ठोकत भारताला ऑकलंड येथे झालेल्या दुसर्‍या टी-20 मॅचमध्ये विजय मिळवून दिला.

फेसबुक पेज लाईक करा –