खुशखबर ! 10 वी पास उमेदवारांना मुलाखती शिवाय मिळणार सरकारी नोकरी, 3262 जागांसाठी भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. राजस्थान पोस्टल सर्कलमधील हजारो पदांवर ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरु झाली आहे. आता अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. भारतीय टपाल विभाग राजस्थान पोस्टल सर्कलमधील एकूण 3262 पदांवर उमेदवारांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. याची अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे.

पदांची माहिती

अनारक्षित – 1527 पदे
ओबीसी – 348 पदे
आर्थिक दुर्बल विभाग – 278 पदे
अनुसूचित जाती – 544 पदे
एससी – 544 पदे
एसटी – 468 पदे
दिव्यांग ए – 32 पदे
दिव्यांग बी – 23 पदे
दिव्यांग सी – 32 पदे
दिव्यांग डीई- 10 पदे
एकूण पदांची संख्या – 3262

अर्जाची माहिती

इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 6 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली असून 12 ऑगस्ट 2020 ही अंतिम तारीख आहे. सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पुरुष उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 100 रुपये फी भरावी लागेल. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरली जाऊ शकते.

आवश्यक पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डाकडून गणित, इंग्रजी व स्थानिक भाषेसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांच्या निवडीसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे. आरक्षणाच्या नियमानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिल होण्याचा लाभ मिळेल.

निवड प्रक्रिया

पात्र उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.