भारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी ! लवकरच वीज व डिझेलविना धावणार ट्रेन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील तीन महिन्यांपासून भारतीय रेल्वेने बऱ्याच गोष्टी नव्याने सुरु केल्या आहेत. क्लीन फ्लुलच्या वापरात रेल्वेने आणखी वाढ केली आहे. भारतीय रेल्वेने बॅटरीवर चालणारे इंजिन तयार केले असून त्याची यशस्वी चाचणीही केली आहे. तर आता हे सांगणं चुकीचे ठरणार नाही की आता काही दिवसांत बॅटरीवर धावणारी रेल्वे पहायला मिळणार आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हे इंजिन वीज आणि डिझेलचा वापर वाचवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या जबलपूर विभागात एक बॅटरीने चालणारे ड्युअल-मोड शंटिंग लोको ‘नवदूत’ तयार करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. ज्याची चाचणी यशस्वी झाली आहे. डिझेल वाचवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ही बॅटरीवर चालणारी लोको एक मोठं पाऊल असेल.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून सांगितले की, ही बॅटरीवर चालणारी लोको हे उज्ज्वल भविष्याचे लक्षण आहे. जे डिझेलद्वारे परकीय चलन वाचविण्यास आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठे पाऊल ठरेल.

गेल्या आठवड्यात रेल्वेने 2.8 किमी लांबीची मालवाहतूक रेल्वे रुळावर आणून इतिहास रचला. रेल्वेने या ट्रेनचे नाव शेषनाग ठेवले आहे. या ट्रेनमध्ये चार इंजिन बसवण्यात आले होते. 251 वॅगन घेऊन ट्रेन धावली. यापूर्वी रेल्वेने 2 किमी लांबीचे सुपर अॅनाकोंडा चालवले, ज्यात सहा हजार हॉर्स पावरची क्षमता असणारी तीन इंजिन स्थापित केली ही. या ट्रेनमध्ये 177 लोडेड वॅगन होते.