तिकिट नाही तर प्रवेश नाही ; रेल्वे स्टेशनवर लवकरच लागू होणार ‘हा’ नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील काही प्रमुख रेल्वे स्टेशनवर आता स्टेशन प्रवेशासाठी तिकिट घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाणार असाल तर तुम्हाला तिकिट घेतल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. विमान तळावर ज्या प्रमाणे आता प्रवेश करण्यासाठी तिकिट आवश्यक आहे त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनवर प्रवेशासाठी तिकिट अनिवार्य असणार आहे. तसेच रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या भिंतीची उंची देखील वाढवण्यात येणार आहे. जेणेकरुन अनाधिकृत पद्धतीने कोणी आत प्रवेश करणार नाही.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.

यात प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वेने लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रेल्वेतील प्रवाशी आणि स्टेशनवर असलेले प्रवासी यांची सुरक्षा आपले मुख्य लक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी आरपीएफ कंमाडोंना विेशेष प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. हे कमांडो रेल्वे स्टेशनच्या प्रवेश द्वारावर तैनात असतील. देशातील गुजरातच्या गांधीनगर, भोपाळच्या हबीबगंज येथील रेल्वे स्टेशनवर या प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच दिल्ली, मुंबई येथील रेल्वे स्टेशनवर देखील याला सुरुवात करण्यात येणार आहे.

सरकारकडून 114 कोटींची तरतूद –
हे साध्य करण्यासाठी सरकारने 114 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या अंतर्गत एक असे मशीन लावण्यात येईल की त्यानुसार तिकिट असलेले कर्मचारीच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश करु शकतील. तसेच रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूना 3 हजार किलोमीटरची उंच भिंत उभारण्यात येईल. जेणेकरून कोणतीही व्यक्ती आतमध्ये येऊ शकणार नाही.

आरपीएफचे महानिर्देशक अरुण कुमार यांनी प्रवाशांची सुरक्षा आमचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले आहे. देशातील रेल्वे स्टेशनची सुरक्षा अंत्यत कमजोर असल्याचे त्यांनी सांगतले.