3 वर्ष धोका देत तो लुटत होता ‘मज्जा’, लक्षात आल्यानंतर तिनं ‘हे’ पाऊल उचललं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंदौर येथील किशनगंज परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एक तरुणाने १९ वर्षीय तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तीन वर्षे संबंध ठेवून तिचे शारीरिक शोषण करत होता. जेव्हा कधी मुलगी विवाहासाठी विचारायची तेव्हा तो तिला टाळायच्या. मात्र, त्या मुलाचे आधीच लग्न झाले आहे, हे समजताच त्या पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशनगंज पोलीस स्टेशन परिसरातील चंदन गुरू बगीचा परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, मुलगी इंदूर द्वारकापुरी भागातील कुंदन नगर येथे राहणाऱ्या नितीन राय याच्या प्रेमात होती. नितीनने लग्नाचे आश्वासन देऊन तरूणीशी तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नितीनचे अगोदरच लग्न झाले आहे, अशी माहिती या पीडितेला समजताच तिला धक्का बसला. यानंतरही तरुणीने नितीनवर लग्नासाठी दबाव आणला. मात्र, नितीनने तुला काय करायचेय ते कर असे म्हणत तरुणीला लग्नासाठी नकार दिला. हे ऐकून धक्का बसलेल्या तरुणीने गळफास घेत, आपले जीवन संपवले.

पोलिसांनी आरोपी नितीनवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याला तातडीने अटक करू शकत नाही, मात्र लवकरच आरोपीला अटक करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/