बदललेल्या जीवनशैलीमुळे येऊ शकते ‘वंध्यत्व’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम- भारतामध्ये सुमारे २.७५ कोटी जोडपी वंध्यत्वाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. यामध्ये बहुतांश शहरामध्ये राहणाऱ्या महिला असून त्यांना बदललेल्या जीवनशैलीमुळे गर्भधारणा होत नसल्याचे ‘इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या समस्येतून बाहेर पडायचे असल्यास या जोडप्यांना काही काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे आलेल्या वंधत्वाची अनेक कारणे आहेत. ही कारणे आपण समजून घेणार आहोत.

जंक फूडमुळे कमरेच्या आजूबाजूला चरबी वाढते. यामुळे ओव्हेल्युशनमध्ये त्रास होतो आणि पीसीओडीची समस्या निर्माण होते. चायनीज फूडमधील सॉसमुळे हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि जंक फूडमुळे मधुमेहाची शक्यताही बळावते. छोट्या छोट्या दुखण्यातही काही महिला स्वताच्या मनानेच औषधे घेत असतात. अनेकदा या औषधांच्या दुष्परिणामामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. चांगल्या प्रजनन क्षमतेसाठी ही औषधे घेणे टाळले पाहिजे. डॉक्टरच्या सल्ल्यािशवाय कोणतीही औषधे घेणे टाळावे. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी ओवुलेशन पीरियडबाबत माहिती असावी. ते साधारणत: १२-१३व्या दिवशी उपलब्ध असते. त्या काळात शारीरिक संबंध असणे गरजेचे आहे.

पती किंवा पत्नी धूम्रपान करत असेल अथवा ड्रग्ज, दारू पित असतील तर यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ लागते. फक्त महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही याचे सेवन करू नये. फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन १२, सेलेनियम, मल्टी व्हिटॅमीन, फेलेिनयम आणि इतर एलिमेंंट्स या घटकांची भरपूर मात्रा घेतल्यास वंध्यत्वावर परिणाम होत नाही. म्हणून हिरव्या पालेभाज्या, सलाड, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खावेत. तणाव नियंत्रित करणाऱ्या कार्टिसोल हॉर्मोनचे प्रमाण नियंत्रणात न राहिल्यास फर्टिलिटी कमी होऊ शकते. म्हणून ऑफिस किंवा घरात तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केल्यास गर्भधारणा होऊ शकते.