काय सांगता ! होय, ऋषी कपूर स्वतःच्या लग्नात पडले होते ‘बेशुध्द’

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची पहिली भेट 1974 साली प्रदर्शित झालेला ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या वेळी ऋषी कपूर आणि त्यांचे प्रेयसीचे भांडण झाले होते. तिला पुन्हा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. यात नीतू त्यांना मदत केल्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झाले होेते. त्यानंतर अखेर त्यांच्या लग्नात ऋषीकपूर यांना भोवल आली असल्याचे नीतू यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

ऋषी कपूर आणि नीतू यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या होत्या. ऋषी कपूर यांचे वडिल राज कपूर यांना हे कळताच त्यांनी ऋषी कपूर यांना नीतूसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अखेर 1979मध्ये दोघेही लग्न बंधनात अडकले. लग्नसोहळ्यात ऋषी कपूर यांना भोवळ आली होती. लग्नातील गर्दी पाहून ऋषी कपूर यांना चक्कर आली असावी असे नीतू यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले. ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नसोहळ्याला अभिनेत्री रेखा यांनीदेखील हजेरी लावली होती. रेखा या लग्नाला नवरी प्रमाणे नटूनथटून आल्या होत्या. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुकू आणि कपाळावर टिकली अशा रुपात रेखा यांनी लग्न सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.