फक्त एकदा पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा, खूप कामाची ‘ही’ पोस्ट ऑफिसची ‘स्कीम’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस ग्राहकांना नवनव्या योजना उपलब्ध करून देत असते. पोस्टात गुंतवलेले पैसेही चांगला परतावा मिळवून देतात. पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (MIS) बचत योजना आहे. या योजनेत एकदा गुंतवणूक करून दरमहा व्याज मिळवू शकता. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. यामध्ये खातेधारकाला दरमहा जमा झालेल्या रकमेवर व्याज मिळते. 1 जुलै 2019 पासून या योजनेला वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळत आहे.
MIS योजना म्हणजे काय ? –
एमआयएस योजनेत सिंगल आणि ज्वाइंट दोन्हीही खाती उघडता येतील. वैयक्तिक खाते उघडताना तुम्ही या योजनेत किमान 1,500 आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. तथापि, ज्वाइंट खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
MIS योजनेचे फायदे –
दोन किंवा तीन लोक ज्वाइंट अकाउंट देखील उघडू शकतात. या अकाउंटच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सदस्यास समान दिले जाते. ज्वाइंट अकाउंट कधीही सिंगल अकाउंटमध्ये रूपांतरित करता येऊ शकते. सिंगल अकाउंटदेखील ज्वाइंट अकाउंटमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांचा संयुक्त अर्ज द्यावा लागेल.
पैसे काढण्याची अट –
एकाविशिष्ट कारणासाठी या योजनेत जमा केलेली रक्कम मुदतीपूर्वीच काढता येते मात्र त्यामध्ये काही रक्कम कापून घेतली जाते. खाते उघडण्यापासून आपण एका वर्षासाठी पैसे काढू शकत नाही. जर आपण एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ठेवीतील 2% रक्कम कपात केली जाईल. खाते उघडल्यानंतर 3 वर्षानंतर आपण मुदत पूर्ण होण्यापूर्वी कधीही पैसे काढल्यास आपल्या ठेवीपैकी 1% कापून घेतली जाईल.
योजनेची वैशिष्ट्ये –
या योजनेंतर्गत आपण एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते हस्तांतरित करू शकता. जेव्हा या गुंतवणूकीची पाच वर्षांची मुदत पूर्ण होते, त्यानंतर तुम्ही पुन्हा गुंतवणूक करू शकता. एखादा खातेदारदेखील त्यात नामनिर्देशित व्यक्तीची नेमणूक करू शकतो. अचानकपणे खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर नामनिर्देशित व्यक्तीस ठेव ठेवण्याचा अधिकार असतो. या योजनेतील एक खास गोष्ट म्हणजे त्यात टीडीएस लागत नाही, तर या गुंतवणूकीच्या बदल्यात मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागतो.
visit : Policenama.com
- तारुण्य टिकविण्यासाठी तरूणांनी ‘हे’ खावे, व्यक्तीमहत्व खुलण्यासाठी आवश्य
- दम्याचा त्रास असेल तर घरातील ‘हा’ पदार्थ आहे रामबाण उपाय, जाणून घ्या
- मुलींमध्ये अठराव्या वर्षानंतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या, करा ‘हे’ उपाय
- पुरूषांनो, डोक्याला टक्कल पडली असेल तर करा ‘हे’ खास घरगुती उपाय
- महिलांनी ‘हे’ फळ खाल्ले तर येणार नाही ‘हार्टअटॅक’, हे आहेत आरोग्यदायी फायदे
- तुम्हाला ‘ही’ सवय असेल तर वेळीच व्हा सावध, हाडे होऊ शकतात ठिसूळ
- परीक्षेचे टेन्शन घेऊ नका, तणावमुक्त राहण्यासाठी अशी करा तयारी
- आरोग्यासह सौंदर्य प्रदान करणारे आहे ‘हे’ पारंपारिक पेय, नियमित प्या