IPL-2021 ची सर्वात मोठी बातमी ! 19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात सामने, ऑक्टोबर महिन्यात या तारखेला फायनल!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होऊ शकते. तर अंतिम सामना 10 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले की, टूर्नामेंटचे उर्वरित सामने 3 आठवड्यात संपवले जातील, ज्यामध्ये 10 डबल हेडर सामने असतील.

आयपीएल 2021 कोरोना व्हायरसमुळे थांबण्यात आली होती. जेव्हा ही टूर्नामेंट पुढे ढकलली तोपर्यंत 29 सामने खेळून झाले होते. तर 31 सामने अजून व्हायचे आहेत. रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे म्हणणे आहे की, 3 आठवड्याची विंडो या 31 सामन्यांच्या आयोजनासाठी पुरेशी आहे. 3 आठवडे म्हणजे 21 दिवस. या 21 दिवसात भारतीय बोर्डाचा प्लॅन, 7 सिंगल सामने, 4 प्लेऑफ आणि 10 डबल हेडर करण्याचा आहे.

इंंग्लंडहून युएईसाठी उड्डाण घेतील खेळाडू

भारत इंग्लंड सिरीज आपल्या ठरलेल्या वेळेवर सुरू होईल आणि संपेल. ही सिरीज 4 ऑगस्टपासून सुरूहोऊन, 14 सप्टेंबरपर्यंत चालेल. याच सिरीजनंतर भारतीय खेळाडू तेथूनच युएईसाठी ÷उड्डाण घेण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, खेळाडू एका बबलमधून दुसर्‍या बबलमध्ये जात असल्याने त्यांना केवळ 3 दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल.

बीसीसीआयच्या अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले की, लीग सुरू होण्याची तारीख स्टेकहोल्डरला 18 ते 20 सप्टेंबर सांगण्यात आली आहे. 18 सप्टेंबरला शनिवार आहे तर 19 ला रविवार आहे. यामुळे, बोर्ड लीग याच वीकेंडच्या डेटला करू शकते. अशा प्रकारे फायनल 9 किंवा 10 ऑक्टोबरला होऊ शकते. भारतीय टीमचा इंग्लंड दौरासु 14 सप्टेंबरला संपेल, त्यानंतर हनुमा विहारी आणि अभिमन्यू ईश्वरन सोडून इतर सर्व खेळाडून युएईला जातील.

एका फ्रेंचायजीने वृत्ताला दिला दुजोरा

एका फ्रेंचायजीच्या अधिकार्‍याने दुजोरा दिला की, यासंबंधीचे बीसीसीआयचे पत्र मिळाले आहे. टीम अधिकार्‍याने म्हटले, बीसीसीआयने आम्हाला टूर्नामेंटसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. आम्हाला 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यानचा वेळ दिला आहे.