नवी : दिल्ली वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश सरकारमधील तुरुंग राज्यमंत्री असणाऱ्या जयकुमार सिंह जॅकी यांनी एक विचित्र विधान केलं आहे. सध्या आपल्या विधानामुळे ते चर्चेत आले आहेत. शिकलेले लोक वातावरण बिघडवण्याचं काम करतात. त्यामुळे नेत्यांनी शिकलेलं असणं गरजेचं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
#WATCH Sitapur: UP Minister for Jail, JK Singh Jaiki says, "Neta koi padha likha ho, iski usko avashyakta nahi, main mantri hun mere paas niji sachiv hota hai, staff hota hai…jail mujhe thodi chalani hai, jail ke adhikshak baithe hain, jailor baithe hain,unhe chalani hai"(28.1) pic.twitter.com/DlXqCofAvI
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 29, 2020
सितापूर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना तुरुंग राज्यमंत्री जयकुमार सिंह जॅकी म्हणाले, “नेत्यांनी शिकलेलं असणं गरजेचं नाही. याची काहीही आवश्यकता नाही. मी एक मंत्री आहे. माझ्याकडे एक खासगी सचिव असतो, कर्मचारी असतात. तुरुंग मला थोडीच चालवायचं असतं. त्यासाठी तुरुंग अधीक्षक असतात, तुरुंगाधिकारी असतात. त्यांनाच तुरुंगाची व्यवस्था चालवायची असते. मला तर हे वाटतं की, तुरुगांत चांगलं जेवण बनावं. तुरुगांची व्यवस्था चांगली असावी. नेत्यांनी शिकलेलं असण्याची गरज नाही, त्यांना केवळ दूरदृष्टी असायला हवी.” असंही ते म्हणाले.
- पिंपल्सच्या डागांपासून त्रस्त आहात ? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- उत्तम आरोग्यासाठी सुरुवात करा या चार योगा स्टेप्सने
- ALERT ! कोरोना वायरस : बचावासाठी करा ‘हे’ 7 उपाय, ‘ही’ आहेत 6 लक्षणे
- ‘या’ 5 आयुर्वेदिक सुपरफूडमुळे वजन कमी होईल, अशा प्रकारे आहारात समावेश करा
- सकाळी उठून १ तास योगा केल्याने मिळणार अनेक फायदे, दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यास होणार मदत
- ALERT ! थंडीत मॅरेथॉनमध्ये भाग घेताय ? ‘या’ 4 प्रकारे घ्या काळजी, येऊ शकतो ‘हृदयविकाराचा झटका’, ‘ही’ आहेत 8 कारणे