नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय लागू केला होता. या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
It’s 3 yrs since the Demonetisation terror attack that devastated the Indian economy, taking many lives, wiping out lakhs of small businesses & leaving millions of Indians unemployed.
Those behind this vicious attack have yet to be brought to justice. #DeMonetisationDisaster pic.twitter.com/NdzIeHOCqL
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 8, 2019
राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “नोटबंदी या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. लाखो लघुउद्योग नष्ट झाले. लाखो भारतीय असे आहेत जे बेरोजगार झाले. या निर्घृण हल्ल्यामागील आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही.” असं राहुल गांधी म्हणतात. या ट्विटमध्ये राहुल गांधींनी #DeMonetisationDisaster असा हॅशटॅगही वापरला आहे.
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या