Video : जय श्रीरामच्या घोषणेने चिडल्या ममता बॅनर्जी, नाराज होऊन PM मोदींसमोर बोलण्यास दिला नकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जयश्री रामच्या घोषणा दिल्या. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावर भाषण देताना जमावाने घोषणाबाजी सुरू केली. या घोषणांमुळे त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी गर्दीवर खास पार्टी असल्याचा आरोपही केला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सहभाग दर्शविला होता.
#WATCH | I think Govt's program should have dignity. This is not a political program….It doesn't suit you to insult someone after inviting them. As a protest, I won't speak anything: WB CM Mamata Banerjee after 'Jai Shree Ram' slogans were raised when she was invited to speak pic.twitter.com/pBvVrlrrbb
— ANI (@ANI) January 23, 2021
सीएम ममता बॅनर्जी यांनी या घोषणेला कडाडून विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले की, मला वाटते सरकारच्या कार्यक्रमाची काही प्रतिष्ठा असली पाहिजे. हा राजकीय कार्यक्रम नाही. या वेळी त्यांना खूप अपमानास्पद वाटले. एखाद्याला आमंत्रण दिल्यानंतर अपमान करणे आपल्याला शोभा देत नाही. यासह त्यांनी कार्यक्रमात काहीही बोलण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की, मी निषेध म्हणून काहीही बोलणार नाही.
बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमादरम्यान अनेक कलाकारांनी सादरीकरण केले. त्याचबरोबर पंतप्रधानांनी पोस्टल स्टाम्प काढले. शनिवारी कोलकाता येथे बोस यांच्या जयंतीनिमित्त 7 किमी लांबीच्या रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात त्यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप केले. त्यांनी म्हंटले, ‘आम्ही नेताजींचा वाढदिवस केवळ निवडणुकीच्या वर्षातच साजरी करत नाही. आम्ही त्यांची 125 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. नेताजी हे देशातील महान स्वातंत्र्यसेनानी होते. ते एक महान तत्वज्ञ होते. बॅनर्जी यांनी ट्वीटद्वारे बोस आणि त्यांच्या आझाद हिंद फौज यांच्या नावाने अनेक विकासकामांची घोषणा केली आहे.