जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एरंडोलजवळ काळीपिवळी आणि ट्रक यांच्या झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास एरंडोलपासून दोन किलोमीटर अंतरावर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलहून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्रियंका हॉटेलसमोर काळीपिवळी आणि ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. काळीपिवळी एरंडोलहून जळगावच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जात होती. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत पावलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी एरंडोल तालुक्यातील उत्राण, कासोदा परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘जंक फूड’चे हे आहेत ८ धोके, ‘हे’ वाचले तर कधीही खाणार नाही
- जिरे नियमित सेवन करण्याचे ‘हे’ १० फायदे, जाणून घ्या औषधी गुण !
- ‘या’ 11 उपायांनी दूर होईल घोरण्याची समस्या ! जाणून घ्या
- ‘या’ ५ थेरपींच्या मदतीने ‘टेन्शन’ला करा गुडबाय ! जाणून घ्या
- जास्त ‘ग्रीन टी’ सेवन केल्यास होऊ शकते ‘या’ 6 प्रकारचे नुकसान