बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

जालनाः पोलीसनामा ऑनलाईन – बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून एका शेतक-याने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील चांदई ठोंबरे (ता. भोकरदन) येथे रविवारी (दि. 3) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अशोक नाना ठोंबरे (रा. चांदई ठोंबरे) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, चांदई येथील शेतकरी अशोक ठोंबरे यांच्याकडे एचडीएफसी बॅंकेचे 5 लाखाचे कर्ज थकले होते. या कर्जाची मागणी बॅंकेच्यावतीने वारंवार होत असल्याने व कर्ज फेडू न शकल्याने ठोंबरे यांनी स्वतःच्या शेतातील बांधावरील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन रविवारी पहाटे आत्महत्या केली.