कलम ३७० वरून आता रशियाचा पाकिस्तानला ‘दणका’, भारताने घेतलेला निर्णय संविधानाला ‘धरून’च
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर संदर्भात भारताने घेतलेल्या निर्णयाचे रशियाने स्वागत केले आहे. रशियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे कि, काश्मीरच्या विभाजनाचा भारताने घेतलेला हा निर्णय संविधानाला धरूनच घेतला आहे. त्याचबरोबर रशियाला आशा आहे कि, काश्मीरच्या या मुद्द्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता पसरणार नाही.
पुढे बोलताना रशियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे कि, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आपापसांत या मुद्द्यावर निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर हा मुद्दा या दोन्ही देशांमधील वाद वाढण्यास कारणीभूत ठरणार नाही अशी आशा आम्ही करतो. रशियाबरोबरच चीनने देखील भारत आणि पाकिस्तानने या वादाला सोडवण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. कलम ३७० वर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना चीनने म्हटले कि, अशा प्रकारे एकतर्फी निर्णय घेऊन तणावाला दिशा देण्याचे काम करू नये. त्याचबरोबर शांततेला प्राधान्य देण्यात यावे.
दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले होते कि, भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला भीती वाटत आहे कि, या निर्णयामुळे आता त्यांना काश्मिरींना भडकावून दहशतवादी हल्ले करता येणार नाहीत त्याचबरोबर काश्मिरी नागरिकांना आता ते आपल्या बाजूने वळवू शकत नाहीत.
Ministry of Foreign Affairs of Russia: We proceed from fact that the changes associated with the change in the status of the state of J&K and its division into two union territories are carried out within framework of the Constitution of the Republic of India. (2/3) https://t.co/NPbhnG1NtT
— ANI (@ANI) August 10, 2019
- ‘या’ भाज्यांमध्ये आहे ऑरेंजपेक्षा जास्त ‘व्हिटॅमिन सी’, अवश्य वाचा
- यामुळे वाढू शकतात ‘प्रेग्नेंसी’चे चान्सेस, ‘या’ ९ पध्दती आवर्जून करून पहा
- अशी तरुणी करते तुमच्यावर आयुष्यभर प्रेम ! जाणुन घ्या ‘हे’ खास संकेत
- सावधान ! अंधारात ‘स्मार्टफोन’ वापरताय, तर होऊ शकते ‘ही’ समस्या ; जाणून घ्या
- कोमट तेलाने मसाज करा, ‘हे’ आहेत ५ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या
- नात्याचा उलघडा करतात झोपण्याच्या ‘या’ पद्धती, पाहा तुम्ही कसे झोपता
- घरात शुध्द हवा खेळती राहावी यासाठी लावा ‘ही’ ४ रोपे, आजार होतील दूर
- प्रेग्नेंसीमध्ये वापरु नयेत ‘हे’ ४ ब्यूटी प्रॉडक्ट्स, तुमच्यासाठी ठरु शकते धोकादायक!
- ‘नैसर्गिक सौंदर्य’ हवे असेल तर प्रत्येक महिलेने लक्षात ठेवाव्यात ‘या’ ६ टिप्स ; जाणून घ्या