जस्प्रीत बुमरा पहिल्या तीन कसोटी सामन्याबाहेर 

लंडन : पोलीसनामा ऑनलाईन

इंग्लड विरुद्धच्या दारुण पराभवाने भारतीय संघाला अगोदरच जबरदस्त धक्का बसला आहे. वन डे मालिकेतील या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. इंग्लंडविरूद्घच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताची चिंता वाढण्याची दाट शक्यता आहे. 1 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. पण त्यावेळी भारताचा प्रमुख गोलंदाज जस्प्रीत बुमरा पहिल्या तीन कसोटी सामने खेळणार नाही अशी बातमी नुकतीच आहे. आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात बुमराच्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि ती पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे तो खेळणार नसल्याची माहिती समोर आली होती.

[amazon_link asins=’B0772LZLRF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36146f69-8a47-11e8-9c1b-e7f5c4d19910′]

कसोटी मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बुमराचा त्यात समावेश करणार नसल्याची माहिती आली आहे. त्याजागी टी-२० आणि वन डे मालिकेत प्रभावी कामगिरी करणा-या फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते. त्याशिवाय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यालाही कसोटी संघात प्रथमच स्थान मिळण्याची शक्यता आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाने भारताच्या गोलंदाजीची धार तीव्र होणार आहे.

इंग्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार सुरू होता, बुमरा फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे  तो टी -२० सामना खेळू शकला नाही. कसोटी मालिकेत शमीसह गोलंदाजी साठीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर असेल. अष्टपैलू हार्दिक पांड्याला या  संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स पटकावणारा कुलदीप आणि अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या उपस्थित संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र, बुमराचा गैरहजेरीत दिनेश कार्तिक हा पहिली चॉइस असू शकतो.