नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जौनपूरमध्ये सोमवारी मजा मस्करीत लागलेले एक चॅलेंज मृत्यूचे कारण ठरले. अंडे आणि दारुचे चॅलेंज जिंकण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. त्यात 50 अंडे खाण्यावर 2 हजार रुपयांचे चॅलेंज लागले होते. परंतू 42 अंडी खाऊन तो व्यक्ती बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी लखनऊला रुग्णालयात हलवण्यात आले परंतू त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
ही घटना उत्तरप्रदेशच्या जौनपूरमधील बीबीगंज बाजारातील आहे. सुभाष यादव या 42 वर्षाय रहिवाशाबरोबर ही घटना घडली. ते शुक्रवारी एक मित्राबरोबर बीबीगंज बाजारात अंडे खाण्यासाठी गेले. तेथे कोण किती अंडे खाणार यावर चर्चा सुरु झाली. त्यावर चॅलेंज देखील लावण्यात आले. 50 अंडे आणि एक बाटली दारु पिण्याचे चॅलेंज पूर्ण केल्यास 2 हजार रुपये बक्षीस निश्चित होते.
सुभाष यांनी ही चॅलेंज मंजूर केली आणि अंडे खाण्यास सुरुवात केली. त्यांनी 41 अंडे खाले आणि 42 वे अंडे खाताने ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू तब्येत नाजूक असल्याने त्यांना संजय गांधी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. तेथे रात्री उशीरा सुभाष यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.
सुभाषने याच वर्षी दुसरे लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून चार मुली झाल्यानंतर मुलगा हवा म्हणून त्यांनी दुसरा विवाह केला. नातेवाईकांच्या मते त्यांची दुसरी पत्नी गर्भवती आहे. सध्या संपूर्ण गावात याच घटनेची चर्चा आहे.
Visit : Policenama.com
- भात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क ! बिनधास्त करा सेवन
- क्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली ? जाणून घेवूयात रहस्य
- वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या
- ‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय
- भातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
- मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट
- सावधान ! जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे
- गर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता
- ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ हवेत का ? मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा
- पौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस !