‘तबलिगींवर व्यक्त कधी होणार ?’ अशोक पंडितांचा जावेद अख्तरांना ‘सवाल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गीतकार जावेद अख्तर समाजात घडणार्‍या घटनेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतात. यावेळीदेखील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून बृन्मुंबई महानगरपालिकेचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले होते. मात्र त्यांचे ट्विट चित्रपट निर्माते अशोक पंडित यांना रुचले नसून त्यांनी जावेद अख्तर यांच्यावर टिकास्त्र सोेडले आहे. ‘सर, तबलिगींवर तुम्ही कधी व्यक्त व्हाल ?’ असा खोचक सवाल पंडित यांनी विचारला आहे.

कोरोनामुळे देशात लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक नागरिकाला घरात राहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवस-रात्र काम करत असून बीएमसीकडून प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करुन पाहत आहे. त्यामुळे अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून बृन्मुंबई महानगरपालिकेचे ( बीएमसी) आभार मानले होते.

मात्र त्यांचे ट्विट पाहिल्यानंतर बॉलिवूड चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अख्तर यांनी टोला लगावला आहे. त्यानंतर जावेद अख्तर यांनीदेखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी ट्विट करत बीएमसीचे आभार मानले होते. मुंबई बीएमसीला माझा सलाम. बीएमसीमुळे आपल्या इथे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना चाचणी करण्यात आली आहे. असे ट्वीट केले होते.