‘Mr. India 2’ची घोषणा झाल्यानंतर डायरेक्टर ‘नाराज’, जावेद अख्तर यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा मिस्टर इंडिया हा सिनेमा त्या काळी सुपरडुपर हिट झाला. हा सिनेमा आजही चाहत्यांना तितकाच आवडतो. अनेकदा या सिनेमाच्या सीक्वलला घेऊन चर्चा झाली आहे. निर्माते बोनी कपूर यांनी या सिनेमाच्या सेकंड पार्टसाठी नकार दिला होता. परंतु हा या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दिग्दर्शक अली अब्बास जफर मिस्टर इंडिया 2 बनवणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर आता मिस्टर इंडियाचे डायरेक्टर शेखर कपूर नाराज झाल्याचं समजत आहे. यावर दिग्गज लिरिसिस्ट जावेद अख्तर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
No one has even asked me or mentioned to me about this film called Mr India 2. I can only guess that they using the title to get a big weekend. For they cannot use the characters/story without permission from the original creators of the film. https://t.co/Set5eDH63j
— Shekhar Kapur (@shekharkapur) February 18, 2020
मिस्टर इंडियाचे डायरेक्टर शेखर कपूर यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. अली अब्बास जफर यांनी मिस्टर इंडिया 2 ची घोषणा करण्याआधी त्यांच्यासोबत बातचित करायला हवी होती. त्यांनी संवाद साधणं गरजेचं वाटलंन नाही.
शेखर कपूर यांच्या या मताशी जावेद अख्तर हे सहमत नसल्याचं समजत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रााच्या मुलाखतीत बोलताना जावेद अख्तर म्हणाले, “आज शेखर कपूर नाराज आहेत कारण मिस्टर इंडिया 2 च्या मेकर्सनी त्यांच्याशी संवाद साधला नाही. परंतु त्यांनी शेखरसोबत बातचित का करावी? मिस्टर इंडिया 2 च्या मेकर्सना मॉरल ग्राऊंडवर बोलण्यासाठी सक्ती असू शकते परंतु लीगली त्यांना कोणतीही सक्ती नाही. आणि त्यांची ही क्रिएटीव थिंकिंग तेव्हा कुठे गेली होती जेव्हा त्यांनी बाऊंड स्क्रिप्टशिवाय शुटींग सुरू केली होती ?”