Jayant Patil | खतासाठी शेतकऱ्यांना जात विचारणे अत्यंत दुर्दैवी : जयंत पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil | सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात आहे. या प्रकारामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या सगळ्या प्रकाराचा निषेध केला आहे. या प्रकारामुळे समाजात जातीभेद वाढेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
काय म्हणाले जयंत पाटील?
“खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल, असं मला वाटत नाही.
हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल. अशाप्रकारे शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.” असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.
या सगळ्या प्रकारामुळे समाजातील जातीभेद आणखी वाढेल. याचे भान सरकारने ठेवले पाहिजे.
तसेच असे प्रकार ताबोडतोब बंद केले पाहिजे,” असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
Web Title :Jayant Patil | asking farmer caste for fertilizer is unfortunate and shocking jayant patil ncp
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
Nashik ACB Trap | नाशिक भूमि अभिलेखचे आणखी दोन अधिकारी आणि खासगी एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात