Jayant Patil on BJP | ‘भाजप रडीचा डाव खेळतंय मात्र महाविकास आघाडी सरकार घाबरत नाही’ – जयंत पाटील

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची (Demand Of President’s Rule In Maharashtra) मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil on BJP) भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप रडीचा डाव खेळत आहे मात्र महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) घाबरत नसल्याचं जयंत पाटील (Jayant Patil on BJP) यांनी म्हटलं आहे.

 

आणीबाणीसारखी (Emergency) परिस्थिती असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी करत असल्याचं जयंत पाटील  यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (MNS Chief Raj Thackeray) सभेच्या परवानगीबाबतही भाष्य केलं.

महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचं काम राज ठाकरे करत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याचे चित्र समोर येत आहे, अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंना परवानगी द्यायची कशी असा प्रश्‍न पोलीस प्रशासनासमोर उभा राहत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

 

दरम्यान, भाजप हा लढणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी करणार
नसल्याचं भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Jayant Patil on BJP | ‘Mahavikas Aghadi Maharashtra Government Minister NCP Leader Jayant Patil On BJP In Aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा