झारखंडच्या जनतेनं मोदी, शहांचा ‘अहंकार’ चकनाचूर केला, राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याची टिप्पणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये भाजपला सत्ता मिळवता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण ताकद पणाला लावून देखील भाजपवर पराभवाची नामुष्की ओढावली. तर झारखंडच्या जनेतेने नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या अहंकाराचा चकनाचूर केला असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1709517945857674&id=312212405588242

झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी पूर्ण ताकद लावली होती. सुधारित नागरिकत्व कायदा आणून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदी-शहांचे प्रयत्न वाया गेले. झारखंडमधील जनतेनं भाजपला नाकारलं. महाराष्ट्रानंतर आता झारखंड देखील भाजपने गमावले आहे. तर भाजपचा अहंकार धुळीस मिळाला असल्याचा म्हणत नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला.

नवाब मलिक यांनी फेसबूकवर पोस्ट करून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या अहंकाराचा चकनाचूर केल आहे. तर हा लोकशाहीचा विजय असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असून हे राज्य भाजपच्या हातून जाणार असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/