नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्राय (TRAI) च्या नवीन पॉलिसीनुसार जिओने IUC चार्ज लावायला सुरुवात केली आहे. मात्र यामुळे ग्राहकांवर कोणताही मोठा बोजा पडणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे कारण 6 पैसे प्रती मिनिट दर आकारणीसोबतच कंपनी ग्राहकांना अतिरिक्त इंटरनेट डेटा देणार आहे. आजपासून हा दर लावण्यात येणार असून दुसऱ्या कंपनीच्या क्रमांकावर फोन केल्यास यापुढे तुम्हाला प्रतिमिनिट 6 पैसे दर द्यावा लागणार आहे.
म्हणून लावला 6 पैसे प्रति मिनटचा चार्ज
जिओ वरून दुसऱ्या नेटवर्कला कॉल केल्यावर हा चार्ज लागू होतो. ट्राय ने हा दर बंद करेपर्यंत हे सुरु होणार आहे. ट्राय 1 जानेवारीपासून IUC न लावण्यावर ठाम होते. एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर कॉल केल्यावर IUC चार्ज लागू होतो. जिओ ग्राहकांना फ्री कॉलिंग देत होते. त्यामुळे IUC चार्ज जिओ भरत असे यामुळे जिओ ने आतापर्यंत विविध कंपन्यांना 13,500 कोटी रुपये चार्ज भरला आहे. त्यामुळे या नुकसानीपासून वाचण्यासाठी जिओने हा निर्णय घेतला आहे.
1 जानेवारी 2020 पासून द्यावा लागणार नाही चार्ज
ट्रायने जानेवारी 2017 मध्ये हा नियम लागू केल्यानंतर हा चार्ज 14 पैश्यांवरून 6 पैसे प्रतिमिनिट केला होता. हा दर त्यांनी 31 डिसेंबर 2019 पर्यंतच ठेवला होता. त्यामुळे 1 जानेवारी 2020 पासून जिओ ग्राहकांना हे दर द्यावे लागणार नाहीत. मात्र जर ट्रायने नियमांनुसार ते बंद नाही केले आणि चालूच ठेवले तर मात्र कंपनी ग्राहकांकडून हे चार्ज घेणे सुरूच ठेवणार आहे.
आययूसी चार्ज संपवण्याची जीओची तयारी
जिओच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या हे दर 31 डिसेंबर 2019 पर्यंत लागू केले आहेत. हे दर अस्थायी असून कायम स्वरूपी नाहीत. त्यामुळे ट्रायने नियमांत बदल केले तर ग्राहकांना 1 जानेवारी 2020 पासून हे चार्ज द्यावे लागणार नाही.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर