मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीने ग्रँड हयात हॉटेलमध्ये आपल्या सर्व आमदारांना एकत्र आणत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर लगेचच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली. हा पोरखेळ लावला आहे. अशा प्रकारे ओळख परेड आणि शपथविधी घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आमि शिवसेनेने जनतेने निवडून दिलेल्या आमदारांचा तर अपमानच केला. ओळख परेडमुळे विश्वासदर्शक ठरावातील विधानसभेतील संख्याबळ सिद्ध होत नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर केली.
आशिष शेलार जी
हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे. पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही जिथे ते सिद्ध करायला घाबरून कोर्टात दिवस ढकलताय
लोकशाही शी खेळ करणार्यांनी आपले बघावे बहुमताचा दांडू तुमची विटी करणार— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 25, 2019
आशिष शेलार यांच्या पत्राकर परिषदेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने, आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे. पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही. जिथे ते सिद्ध करायला घाबरून कोर्टात दिवस ढकलताय, लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांनी आपले बघावे. बहुमताचा दांडू तुमची विटी करणार.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगेळे वळण लागले असून रोज नव्या घडामोडी होताना दिसत आहेत. त्याचत आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘आम्ही 162’ असे ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना एकप्रकारे ओपन चॅलेंजच दिले आहे. सायंकाळी सातच्या सुमारास शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे आपल्या सर्व 162 आमदारांना एकत्र घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
Visit : Policenama.com
- सकाळची पौष्टीक न्याहारी करते आजारांपासून दूर ठेवण्यास मदत
- ऑफिसमधील वातावरणाचा होतो आरोग्यावर परिणाम, ‘ही’ आहेत 8 कारणे
- सावधान ! आजारावर ‘ऑनलाइन उपचार’ शोधताय ? ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा
- मित्रमंडळींपासून दूर राहिल्यास वार्धक्यात विस्मृतीचा धोका ! ‘हे’ आहेत 4 दुष्परिणाम
- पाणी प्यायचे कसे ? चुकीच्या पद्धतीमुळे होईल पचनाचा आजार, ‘हे’ 8 नियम पाळा
- बाळंतपणानंतर ‘ही’ अतिघाई ठरू शकते आरोग्यासाठी घातक ! जाणून घ्या 6 उपाय
- ‘विहंगम’ योग संस्थानाद्वारे पुण्यात भव्य अध्यात्मिक कार्यक्रम, ५०१ कुंडीय विश्व शांती यज्ञ, तुम्ही देखील घ्या ‘लाभ’ !