मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विनोद तावडे यांचे तिकीट कापल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडेंना उमेदवारी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच अशी वेळ कुणावरही येऊ नये. आज मी त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना काय झाल्या असतील, हे समजू शकतो, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांना उद्देशून विनोद तावडे म्हणाले होते, अशी वेळ कुणावरही येऊ नये असे सांगत अशोक चव्हाण यांना विधानसभा निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तावडेंचे तिकीट कापल्यानंतर त्यांची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली असून तावडें यांची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे.
विधानसभेच्या कामकाजावेळी विनोद तावडे यांनी आव्हांना उपरोधात्मक टोला लगावला होता. त्यांना बोलू द्या… पुढच्या वेळी ते विधानसभेत येतील की नाही याची काही खात्री नाही, असा टोमणा मंत्री तावडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत लगावला होता. भाजपने विनोद तावडे यांचे तिकीट कापले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेतील तो किस्सा आठवल्यानंतर त्यांनी आता विनोद तावडे विधानसभेत दिसणार नाहीत हे स्पष्ट झाल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
- औषधोपचाराने डोकदुखी बरी होत नसल्यास असू शकतात ‘हे’ गंभीर आजार
- ‘या’ सापाचा वापर होतो चक्क ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी, जाणून घ्या
- आरोग्य समस्या दूर करण्यासाठी पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, जाणून घ्या
- तुम्ही चिकन जास्त खाता का ? ‘फर्टिलिटी रेट’ होऊ शकतो कमी, जाणून घ्या
- ‘प्रेग्नेंसी’ला बाधक ठरतात ‘ही’ १० कारणे, पुरुषही असतात जबाबदार, जाणून घ्या
- भूक लागत नाही, ‘हा’ सुद्धा आहे एक आजार, वेळीच करा ‘हे’ उपाय
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या