मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र पेटवणार असा इशारा दिला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला भारत सराकारने बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण देण्याचे घोषित केल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी याच्या निषेधात्मक ट्वीट केले.
महाराष्ट्र पेटवणार, परत एकदा. राज्यात शिव सन्मान परिषदा घेणार, सरकारने ब. मो. पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांवर मीठ चोळले, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच या ट्विटमध्ये श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराव, सुषमा परदेशी यांचा उल्लेख आव्हाडांनी केला आहे.
शिवद्रोही ब.मो. पुरंदरे ना पदमविभुषण जाहिर….
छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट … महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतयं….— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 25, 2019
ज्यांनी माँसाहेब जिजाऊंची बदनामी करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या, अशा लोकांना का मोठे करत अहात. महाराजांची बदनामी करणाऱ्यांना सरकार पोसत आहे. तसंच महाराजांच्या इतिहासाची विकृती करणाऱ्या पुरंदरेंना परत पडद्यावर आणत असाल तर आम्ही वैचारिक पातळीवर महाराष्ट्र पेटवणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ज्यांनी केली महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी, ते ह्या मनुवादी सनातन्यांचे मुकुटमणी, असंही त्यांनी म्हटलं आहे. २०१५ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड यांनी त्याला विरोध केला होता.
हा घ्या छोटासा पुरावा pic.twitter.com/oizCmkBb37
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2019
महाराष्ट्र पेटवणार …..
परत एकदा ….
शिव सन्मान परिषदा घेणार
ब.मो.पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांना मीठ चोळले#श्रीमंतकोकाटे #ज्ञानेशमहाराव#सुषमापरदेशी #जयजिजाऊजयशिवराय— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2019
ब.मो.पुरंदरेंना पडमविभूषण हा शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळण्याचा धंदा …शिव विचारांनी महाराष्ट्र पेटवणार …. pic.twitter.com/QbinKjENo8
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2019