अभिनेत्री जुही चावलानं ‘या’ भीतीनं लपवलं होतं लग्न, 25 वर्षांनंतर केला ‘खुलासा’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जुही चावला हिनं अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत लग्नाबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल खुलून भाष्य केलं आहे. जुहीचा पती जय मेहतानं तिला कसं प्रपोज केलं, दीर्घकाळ तिनं लग्न आणि आपल्या खासगी आयुष्याला बातम्यांपासून दूर का ठेवलं याचाही खुलासा तिनं केला आहे.

जुहीनं अलीकजेच राजीव मसंदला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारण्यात आलं की, जयसोबतचं लग्न एवढं सिक्रेट का ठेवलंस. यावर बोलताना जुही म्हणाली, “त्यावेळी कोणाकडे जास्त इंटरनेट नव्हतं. मोबाईलध्ये कॅमेरा नव्हता. मग असंच होणार होतं ना. त्यावेळी मी नुकतीच माझी ओळख बनवली होती. मी चांगल्या प्रकारे काम करत होते. हा तोच काळ होता जेव्हा जय माझ्या आयुष्यात आला. मला भीती वाटत होती की माझं करिअर बुडू नये. मला हेही सुरूच ठेवायचं होतं. म्हणून मला असं करणं हा मला एक मधला मार्ग वाटला.” असं तिनं सांगितलं.

आपल्या लव स्टोरीबद्दल खुलासा करताना जुही म्हणाली, “करिअरच्या सुरुवातीला आम्ही भेटलो होतो. यानंतर काही काळ आमचं बोलणं नाही झालं. परंतु नंतर जेव्हा पुन्हा आम्ही भेटलो तेव्हा जय दीवाना झाला होता. मी जिथे असायचे तिथे तो फूल घेऊन आणि प्रेमाच्या नोट्स घेऊन पोहोचायचा. माझ्या वाढदिवसाला जयनं मला एक ट्रक भरून लाल गुलाब पाठवले होते. हे पाहून तर मी चकित झाले होते.”

जुहीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर जुही चावला आणि जय मेहता 1995 मध्ये विवाहबद्ध झाले होते. जय मेहता एक बिजनेसमन आहे. त्यांच्या नात्याबद्दल जवळच्या काही मित्रांना आणि नातेवाईकांनाच माहिती होतं. या कपलनं आता सहजीवनाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. जुहीला 2 मुलं आहेत. तिच्या मुलीचं नाव जान्हवी आणि मुलाचं नाव अर्जुन आहे.

https://www.instagram.com/p/B7fabYNh1cE/

https://www.instagram.com/p/B67fSI9hXzO/

https://www.instagram.com/p/BzDVCBAh05b/