धक्कादायक ! ‘अभिषेक-ऐश्वर्या’चं लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरनं भर लग्नमंडपात कापली होती हाताची नस !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी 20 एप्रिल 2007 रोजी बच्चन घराण्याच्या प्रतिक्षा निवास येथे लग्न केलं होतं. 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. परंतु 2003 मध्ये हा साखरपुडा मोडला. अभि आणि ऐशच्या लग्नादरम्यान एक घटना घडली होती जी मीडियामध्ये चांगलीच चर्चेत आली होती.

तब्बल 13 वर्षानंतर आता तेव्हा मीडियात चर्चेत असणाऱ्या घटनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या यांच्या लग्नादरम्यान भर लग्नमंडपात ही घटना घडली होती. लग्नाच्या आधी या घटनेमुळं एक वगेळेच वळण आले होते. जान्हवी कपूर नावाच्या एक मॉडेलने भर मंडपात एन्ट्री करून आपल्या हाताची नस कापून घेतली होती. तिला काहीही करून हे लग्न थांबवायचं होतं.

या मॉडेलने असा दावा केला होता की, अभिषेक आणि तिची दस या सिनेमादरम्यान जवळीक वाढली होती. याशिवाय जान्हवीनं अभिषेकवर अनेक गंभीर आरोप केले होते. या मॉडेलने तर असाही धक्कादायक खुलासा केला होता की, काही मित्रांच्या साक्षीने या दोघांनी लग्नही केलं होतं.

जान्हवीने अभिषेकसोबत दस बहाने या गाण्यात काम केलं होतं. जेव्हा मॉडेल जान्हवी कपूरला काही पुरावा आहे का असे विचारण्यात आले तेव्हा तिने सांगतिले की, प्रेमाला कसल्याही पुराव्याची गरज नसते. सुसाई़ड करण्याच्या आरोपाखाली जान्हवीला अटकदेखील झाली होती. या घटनेने पूर्ण बच्चन परिवार हादरून गेले होते. चौकशीनंतर असं समोर आलं होतं की, हा एक पब्लिसिटी स्टंट आहे.

अभिषेक आणि ऐश यांच्या लग्नाला आता 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. अभिषेक आणि ऐश यांनी रावण, कुछ न कहो आणि गुरु यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. मनिरत्नम हा त्यांचा शेवटचा सिनेमा आहे. या दोघांची रिअल लाईफ केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.