जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, ‘या’ नेत्याची ‘डिमांड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी झालेली चौकशी व्यवस्थित झाली नाही असे मत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी मांडले. तसेच जस्टीस लोया प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करावी. लोया यांच्या खून कसा झाली याचा तपास नीट झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली.

हुसेन दलवाई म्हणाले की न्या. लोया यांच्या खूनाचा तपास नीट झाला नाही. त्यांचा खून का झाला याची चौकशी झाली पाहिजे. या खूनामागे दहशतवादी संघटनेचा, तसेच विशिष्ट विचारधारेचा समावेश आहे. त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन दिवसांपूर्वी सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे 10 वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावी या विनंतीसह दाखल याचिका फेटाळली. अ‍ॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. यावर शरद पवारांनी बोलताना सांगितले की जर मागणी असेल आणि गरज असेल तरच लोया प्रकरणाची चौकशी करावी.

जस्टीस लोया प्रकरणाबाबत मला जास्त माहिती नाही, मी फक्त वर्तमानपत्रात काही लेख वाचले आहेत. यावरुन या प्रकरणी मुळापर्यंत जाऊन चौकशी केली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रात अनेक लोकांची आहे. माझ्याजवळ यासंदर्भात डिटेल माहिती नाही. परंतू मागणी होत असेल तर सरकारने याबाबत विचार केला पाहिजे. या चौकशीची मागणी करणारे कोणत्या आधारे मागणी करत आहेत, यामध्ये काय तथ्य आहे, याची चौकशी केली पाहिजे. जर काही आढळले तर रिइन्व्हेस्टीगेशन करायला पाहिजे. मात्र काहीच नसेल तर एखाद्याविरोधात आरोप लावण्यासाठी असे करणे चुकीचे आहे असे मत पवारांनी मांडले.

न्या. लोया यांच्याकडे सोहराबुद्दीन चकमक खटल्याची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना सतत धमक्या दिल्या जात होत्या. तसेच यातूनच मार्च – 2015 मध्ये एका गुप्त बैठकीत त्यांना रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विष देण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप करत सतिश उके यांनी या प्रकरणी सुनावणीची मागणी केली होती. तर वर्तमान पत्रात देखील जस्टीस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी अनेक लेख छापले गेले होते. परंतू सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी सुनावणी करणाऱ्या सीबीआय न्यायलयाचे न्या. लोया यांचा नागपूरात हृदयक्रिया बंद होऊन नैसर्गिक मृत्यू झाला

न्या. लोया यांच्याकडे सोहराबुद्दीन चकमक खटल्याची जबाबदारी होती. त्यावरून त्यांना सतत धमक्या दिल्या जात होत्या. तसेच, त्यातूनच मार्च-2015 मध्ये एका गुप्त बैठकीत त्यांना रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विष देण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप करत याप्रकरणाच्या चौकशीची मागणी सतिश उके यांनी केली होती. तर, वर्तमानपत्रातही जस्टीस लोयांच्या मृत्यूच्या संशयासंदर्भात अनेक लेख छापून आले आहेत. पण, सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सीबीआय न्यायालयाचे न्या. बी.एच. लोया यांचा नागपूरमध्ये हृदयक्रिया बंद पडून नैसर्गिक मृत्यू झाला, याबद्दल संशय घ्यायला जागा नाही अशी ग्वाही देऊन या मृत्यूचा निष्पक्ष तपास करण्यासाठी आलेल्या चारही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

या प्रकरणात भाजपाध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही आरोपी होते. लोया यांच्या मृत्यूनंतर आलेल्या न्यायाधीशांनी त्यांना आरोपमुक्त केले. त्यामुळे लोया यांच्या मृत्यूचा शाह यांच्या आरोपमुक्तीशी संबंध नसावा ना अशी शंका उपस्थित करण्यात आली होती.

Visit : policenama.com