तापसी पन्नूच्या ट्विटवर कमाल खानने व्यक्त केला संताप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  वादग्रस्त वक्तव्यामुळे बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खान नेहमीच समाज माध्यमांमध्ये चांगलाच चर्चेत असतो. बॉलिवूड कलाकारांवर कमाल नेहमीच टीका करीत असतो. यावेळी त्याने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री तापसी पन्नूवर टिका केली आहे. कारण, तापसीनं रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला होता. तिच्या या निर्णयावर कमाल खानने संताप व्यक्त करत ‘जनता तुला माफ करणार नाही’, अशा शब्दांत त्याने तापसीवर राग व्यक्त केला आहे.

तापसीने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाली की, “रिया चक्रवर्ती एक पवित्र मुलगी आहे. जनता आणि माध्यमांना रियाला दोषी ठरवण्याचा काहीही अधिकार नाही. मला खात्री आहे रिया निर्दोष सुटेल. तिला न्याय मिळेल.” यावर कमाल ट्विट करुन म्हणाला की, “तापसी पन्नू जनता हे लक्षात ठेवेल. कोणीही तुला माफ करणार नाही.”

https://twitter.com/kamaalrkhan/status/1300263511466049537?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1300263511466049537%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan-news%2Fkamaal-r-khan-taapsee-pannu-rhea-chakraborty-sushant-singh-rajput-case-mppg-94-2265202%2F

लक्ष्मी मानचू हिच्या ट्विटला रिट्विट करत तापसीने अभिनेत्री सुशांत प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. “मी सुशांत किंवा रियाला वैयक्तीक पातळीवर ओळखत नव्हते. एखाद्या व्यक्तीला कायद्याने दोषी ठरवण्याच्या आधीच त्याला गुन्हेगार म्हणून घोषित करणे चुकीचं आहे. कृपया या देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा.” अशा आशयाचं ट्विट करुन तापसीनं रियाला पाठिंबा दिला होता.

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्यानंतर सुशांतचे वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार केली. सीबीआयमार्फत सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. समाज माध्यमांमधून रिया चक्रवर्तीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.